
“आदिवासी समाज बांधवांचा मोर्चा मानोरा तहसिल कचेरीवर धडकला”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
अशोक रत्नपारखी, वाशिम
दि. २४ सप्टेंबर रोजी निघालेल्या मोर्चामध्ये हजारो आदिवासी समाज बांधव सहभागी झाले होते. तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आदिवासी समाज बांधवांच्या विविध संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी निवेदन पाठविले. मोर्चा मध्ये विविध घोषणा देण्यात आल्या.
वेगवेगळ्या समाजा कडून अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी मोर्चा आंदोलने काढण्यात येत आहे. त्यामुळे इतर समाजाला एसटी आरक्षणात सहभागी करण्यात येवू नये, असे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.
मोर्चात जमलेल्या हजारो आदिवासी बांधवांना आदिवासी समाजातील उच्च विद्या विभूशीत मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन किसन डफडे यांनी प्रास्ताविक अक्षय मस्के यांनी केले, तर आभार प्रदर्शन आनंद खुळे यांनी केले.





