♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

“२८५ सहकारी संस्थांच्या निवडणुकांना राज्य सरकारची स्थगिती”

महाराष्ट्र न्युज लाईव्ह 

 

दिलीप चव्हाण, मुंबई 

 

राज्यभरातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सहकारी साखर कारखाने आणि जिल्हा बँकासह २८५ सहकारी संस्थांच्या निवडणुकांना राज्य सरकारने बुधवारी स्थगिती दिली. राज्यात सध्या ३ हजार १८८ सहकारी संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.

 

यात सहकारी बँका, गृहनिर्माण वित्तीय महामंडळ, सूत गिरण्या, बाजार समित्या, गृहनिर्माण संस्था, साखर कारखाने आणि बँकाचा समावेश आहे.

 

राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. आतापर्यंत ३० जिल्ह्यांत सरासरीच्या ८० टक्केपेक्षा जास्त पाऊस झाला असून त्यापैकी १५ जिल्हयांत सरासरीच्या १०० टक्के पेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

 

त्यामुळे राज्यातील बहुतेक जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामातील शेतीविषयक कामात व्यस्त असल्याने ते सभासद असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे पावसाचा हंगाम पुर्ण होईपर्यंत म्हणजेच ३० सप्टेंबर पर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे.

 

ज्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेतील चिन्ह वाटपाचा टप्पा पूर्ण झाला आहे अशा संस्था, निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे पण पदाधिकाऱ्यांच्या निवडीची प्रक्रिया बाकी आहे अशा संस्था, तसेच ज्या संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत न्यायालयाचे आदेश आहेत अशा संस्थाना या स्थगिती आदेशातून वगळण्यात आले आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129