
“लाल परिचे हेच का अच्छे दिन?”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
अशोक रत्नपारखी, वाशिम
महायुतीचे सरकार काळात “प्रगती वेगवान महाराष्ट्र गतीमान” या ब्रिद वाक्याचे या बसच्या व्हिडिओ मुळे तिन-तेरा वाजले आहे. लातुर जिल्ह्यातील अहमदपुर आगारातील ही भंगार असून या बसने पावसाळ्यात प्रवासी प्रवास करीत असतांना बसच्या छत मधुन पाणी गळत आहे. पाण्यामुळे प्रवासी भिजू नये म्हणून बसमधील प्रवासी छत्री उघडुन पावसाने भिजुनये म्हणून स्वताचे रक्षण करीत आहेत. त्याच सोबतच ड्रायव्हर पाण्यामुळे भिजू नये म्हणून एका प्रवाशाने चक्क बस ड्रायव्हरच्या डोक्यावर छत्री धरुन ड्रायव्हर बस चालवितांना व्हिडिओ मध्ये दिसत आहे.
महायुती सरकार काळात हेच का अच्छे दिन असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याप्रकरणाकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हा व्हिडिओ भरपूर प्रमाणात व्हायरल होत आहे. राज्याचे परीवहन मंत्री ना. सरनाईक यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी जनतेकडून मागणी केली जात आहे. सदर व्हिडिओ आमचे मानोरा प्रतिनिधी अशोक रत्नपारखी यांनी शेअर केला आहे.