
” पक्षाचे नाव आणि चिन्ह परत मिळेल – उद्धव ठाकरे “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
सध्या ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण आपल्याला पाहायला मिळत आहे. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपालाही ठाकरे गटाकडून लक्ष्य करण्यात येत आहे. बुलढाण्यातील शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी ‘मातोश्री’वर बोलताना उद्धव ठाकरेंनी अंधेरी निवडणुकीवरून भाजपावर टीकास्र सोडलं आहे. तसेच, पक्षाचे नाव आणि चिन्ह परत मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
“धनुष्यबाण गोठवलं तरी हातातली मशाल घेऊन तुम्ही पुढे जात आहात. प्रत्येक चिन्हाचं एक महत्त्व असतं. रामाने धनुष्यबाणानेच रावणाला मारलं होतं. तर अन्याय जाळणारी आणि अंधारात वाट दाखवणारी मशाल असते. निवडणूक आयोगानं काही काळापुरता हा आदेश दिला आहे. नंतर आपलं नाव आणि चिन्ह वगैरे परत मिळणारच आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.