
” मुंबईत डोळ्यांची साथ “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत वातावरणात मोठे बदल होत आहेत. मध्येच पडणारे कडक उन्ह आणि अधूनमधून कोसळणारा मुसळधार पाऊस, ढगाळ वातावरण असे बदल सातत्याने होत आहे. याचा परिणाम म्हणून डोळ्यांचा संसर्ग वाढत असल्याचे नेत्रविकार तज्ज्ञ डॉ. राकेश शहा यांनी सांगितले.
डोळ्यांत पाणी येणे, घाण येणे, डोळे लाल होणे, जळजळ होणे अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या सध्या वाढली आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने कुटुंबातील अनेकांना त्रास होत असल्याच्याही तक्रारी आहेत. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि कोणतेही लक्षणे जनाविल्यास त्वरित नेत्रविकार तज्ज्ञांकडे जाऊन उपचार घ्यावेत. मनाने कोणतीही औषधे घेऊ नयेत वा डोळ्यात कोणतेही औषध टाकू नये, असे अवाहनही डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.