
” गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर टीका “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
सांगली
सांगली जिल्ह्यातील आरेवाडी येथे दोन ऑक्टोबर रोजी दसरा मेळाव्याच आयोजन करण्यात आले. आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकारांशी बोलताना माजी पालकमंत्री जयंत पाटलांसंदर्भात सत्तेचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केल्याचं विधान केलं. “जयंत पाटलांच्या मनामध्ये प्रंचड भिती होती की आपलं काहीतरी प्रकरण चर्चेत निघेल. आपल्याबद्दल काहीतरी बोललं जाईल. आपण रुबाबात राहिलोय या जिल्ह्यामध्ये असं त्यांना वाटायचं. जिल्हाधिकारी कार्यालय आपल्या बापाची जहागीरदारी आहे अशा रुबाबात ते वागले होते. त्यांना ते खटकत होतं. त्यामुळे ते मला बोलवत नव्हते,” असं जिल्हा नियोजन बैठकीसंदर्भात पडाळकर म्हणाले.
“माझ्या भावाविरोधात हद्दपार होण्याची नोटीस काढली. आता तेच हद्दपार झाले सत्तेमधून. म्हणजे सत्तेचा इतका माज चांगला नसतो,” असा टोलाही त्यांनी लगावला. “जो जिल्हापरिषदेचा सदस्य आहे. त्याला या जिल्ह्यामध्ये समाज कल्याण सभापती म्हणून सगळ्यात चांगलं काम केलंय. तुम्ही (प्रासरमाध्यमांनी) अनेकदा छापलंय. त्यांना तुम्ही हद्दपार होण्याची नोटीस देता. म्हणजे सत्तेचा गैरवापर करण्याचे तुम्ही किती प्रयत्न केले. मात्र याचं काही झालं नाही. त्यांना वाटलं आम्ही शरण येणार. पण आम्ही शरण येणारी लोक नाही. आम्ही काम करणारी लोक आहोत,” असं पडाळकर म्हणाले. “जेव्हा आमचे पालकमंत्री बैठक घेतील तेव्हा ते सगळ्यांना बोलवतील. ते चुकीच्या पद्धतीने हे सारं घेणं, निरोप न देणं असा कुठलाही प्रकार भाजपाकडून होणार नाही,” असा विश्वासही पडळकर यांनी व्यक्त केला.